.

FAQ's

  • होमिओपॅथी शास्त्र जवळ जवळ २२४ वर्ष जुने आहे. ते संपूर्ण पणे शास्त्रीय प्रयोग आणि वैद्यकीय दाखल्यांवर आधारलेले आहे.
  • होमिओपॅथी शास्त्रा नुसार प्रत्येक मनुष्याचे शरीर आणि त्याची स्वतःची उर्जा, आजारातून बरे होण्यासाठी प्रयत्न करीत असते. होमिओपॅथीक औषध हे त्या उर्जेला चालना देण्याचे काम करून आजाराला बरे करते.
  • होमिओपॅथीची औषधे ही potentisation या शास्त्रीय प्रक्रियेने तयार केली जातात ज्यामुळे औषधाचे प्रमाण कमी करत जाऊन त्यातील फक्त औषधी गुणधर्म वाढविले जातात. म्हणूनच या औषधांचे side effects होत नाहीत.
  • होमिओपॅथीची औषधे ही कशी काम करतात हे अगदी आत्ताच्या nano-technologyच्या शोधामुळे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे आणि या शास्त्राला पूर्णपणे वैज्ञानिक आणि वैद्यकीय पाया आहे हे सुद्धा जगासमोर आणले आहे.
  • होमिओपॅथीचे औषध पटापट आणि त्वरित परिणाम देऊ शकते. अगदी काही तासात, काही मिनिटातसुद्धा!
  • पण त्या औषधाचा परिणाम आणि काम करण्याची पद्धत ही त्या आजारावर, आजाराच्या प्रकारावर, आजार केव्हा पासून आहे यावर आणि तुम्हाला दिलेले औषध कोणत्या प्रकारे दिले आहे यावरही अवलंबून असते.
  • दीर्घकालीन आजार बरे व्हायला वेळ लागू शकतो. पण ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी, जुलाब, उलट्या, दातदुखी यासारखे अल्पकालीन त्रास त्वरित बरे अथवा कमी नक्कीच होऊ शकतात.
  • होमिओपॅथीमधील औषधे ही वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि ती वेगवेगळ्या प्रकारे दिली जातात.
  • या औषधांचे स्त्रोत बरेच असतात, आणि औषधावर प्रक्रिया करून त्यातील औषधी गुणधर्म वाढवले जातात.
  • ही औषधे वेगवेगळ्या स्वरुपात उपलब्ध असतात. alcohol base चे पातळ औषध, पाण्यातील औषध, चूर्ण किंवा गोळ्या इत्यादी.
  • ज्या गोल गोड गोळ्या बहुतांश वेळा दिल्या जातात त्या रुग्णापर्यंत औषध पोहोचवण्याचे एक माध्यम असतात ज्यावर औषधाचे द्रव्य टाकले जाते.
  • होमिओपॅथीच्या विध्यार्थ्यांना रोग निदान करण्याचे पूर्ण शिक्षण त्यांच्या शिक्षण कालावधीत दिले जाते.
  • तसेच एखाद्या रुग्णाला होमिओपॅथीने किती आणि कसे बरे वाटेल, हे ठरवण्यासाठी रोगनिदान महत्वाचे असते.
  • म्हणूनच होमिओपॅथी शास्त्रात देखील रोग निदान तसेच केले जाते जसे इतर आधुनिक वैद्यक शास्त्राचे डॉक्टर करतात.
  • पण होमिओपॅथीचे औषध निवडणे हे फक्त त्या निदानावर अवलंबून नसून ते त्या रुग्णावर, रुग्णाच्या लक्षणांवर, त्याच्या वैशिष्ठ्यांवर आधारलेले असते. म्हणून रोग निदान होण्या आधी देखील होमिओपॅथीचे औषध देता येऊ शकते.
  • काही रुग्णांमध्ये रोग निदान होऊ शकत नाही अथवा रोग निदान होण्याची पातळी येण्याआधीच्या अवस्थेतही (sub clinical stage) होमिओपॅथीचेऔषध देता येऊ शकते. पण याचा अर्थ असा अजिबात नव्हे कि रोग निदान महत्वाचे नाही.
  • आधी म्हणाल्या प्रमाणे रोग निदान होमिओपॅथीमध्ये महत्वाचे आहे. आणि अर्थातच त्यासाठी लागणारी शारीरिक तपासणी देखिल महत्वाची आहे. तसेच रक्त, लघवीच्या किंवा इतर तपासण्यांना देखील महत्व असते.
  • एखाद्या रुग्णाला होमिओपॅथीने किती आणि कसे बरे वाटेल, हे ठरवण्यासाठी तसेच औषध दिल्यावर त्याचा अपेक्षित परिणाम होतो आहे कि नाही हे ठरवण्यासाठी शारीरिक तपासणी आणि लॅबच्या तपासण्या केल्या जातात.
  • रोग निदान करताना, त्याची कारण मीमांसा करताना, औषध योजना करताना अश्या प्रत्येक पायरीवर; रुग्णाचा, ‘त्याचा आजार आणि त्याची मानसिक, शारीरिक व सामाजिक स्थिती’ असा पूर्णत्वाने विचार केला जातो.
  • म्हणून होमिओपॅथीत शारीरिक तपासा इतकेच मानसिक तपासालाही महत्व आहे.
  • आधी नमूद केल्या प्रमाणे होमिओपॅथी शास्त्राला पूर्णपणे वैज्ञानिक आणि वैद्यकीय पाया आहे. ते वैद्यकीय सिद्द्धान्तांवर आधारलेले आहे. यात रुग्णाचा, ‘त्याचा आजार आणि त्याची मानसिक, शारीरिक व सामाजिक स्थिती’ असा पूर्णत्वाने विचार केला जातो. आणि म्हणून तेवढी सखोल माहिती घेणे गरजेचे असते.
  • प्रत्येक गोष्ट विचारण्यामागे, माहिती घेण्यामागे कारण असते. रोग निदान करण्याच्या दृष्टीने किंवा औषध योजना करण्याच्या हेतूने ही माहिती घेतली जाते. रुग्ण जेवढी स्पष्ट, न लपवता आणि मुद्देसूद माहिती देईल, तेवढे कमीत कमी वेळात जास्त माहिती घेता येते, रोग निदान करणे आणि औषध योजना करणे सोपे जाते, योग्य औषध सापडण्यास आणि त्याचा चांगला परिणाम होण्यास मदत होते.
  • रुग्णांनी दिलेली त्यांची खासगी माहिती पूर्णपणे गोपनीय असते.
  • काहीवेळा रुग्णाला अतीतीव्र त्रास होत असेल तर त्यावेळी फक्त त्रासाची माहिती घेऊन त्वरित औषध योजना करता येऊ शकते. आणि तो तीव्र त्रास कमी झाल्यावर पूर्ण माहिती घेऊन नंतरची औषधे देता येतात.
  • सुरुवातीला साधारण माहिती, त्रासाची माहिती घेतली जाते. त्यासाठी लागणाऱ्या शारीरिक तपासण्या, लॅबच्या तपासण्या करायला सांगितल्या जातात. रोग निदान केले जाते, आणि तीव्र त्रास असल्यास त्यासाठी औषध दिले जाते.
  • त्या नंतर सखोल माहिती घेण्यासाठी नियोजित वेळ (appointment) दिली जाते. या मुलाखतीला जास्त वेळ म्हणजे साधारण एक ते दीड तास लागू शकतो. ती माहिती एकदा घेतल्यावर पुढच्या वेळेस जास्त वेळ शक्यतो लागत नाही.
  • प्रत्येक शास्त्राला जश्या मर्यादा असतात तश्याच याही शास्त्राला मर्यादा असणारच.
  • काही आजार मुळासकट बरे होऊ शकत नाहीत, तिथे होमिओपथिकऔषधांनी त्रास कमी करता येऊ शकतो.
  • काही अती तीव्र आजारांमध्ये आधुनिक औषधे घ्यावीच लागतात.
  • काही आजारांमध्ये आधुनिक शास्त्रातील औषधासोबत होमिओपॅथी औषधे घ्यावी लागू शकतात. आणि नंतर हळू हळू त्याची मात्रा कमी करत पूर्ण होमिओपथिकऔषधांवर आजार बरे करता येऊ शकतात.
  • काही आजारांमध्ये शस्त्रक्रियेची गरज असल्यास तीही करायला लागू शकते. आणि नंतर तो आजार परत होऊ नये म्हणून होमिओपॅथी औषधे देता येऊ शकतात.
  • आजार कोणता आहे, किती कालावधी पासून तो आहे, त्याची अवस्था, तीव्रता कशी आहे, आधी त्यावर कोणत्या प्रकारचे उपचार झाले आहेत, या आणि अश्या इतर घटकांवर ठरवता येते की त्या रुग्णासाठी होमिओपथिक औषधे कितपत प्रभावी ठरतील.
  • Online consultation साठी आधी तुम्हाला Appointment घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही WhatsApp वर message करू शकता किंवा call करू शकता.
  • निश्चित केलेल्या वेळेवर WhatsApp, Google duo, Skype या सारख्या माध्यमांद्वारे online consultation होईल.
  • तुमची औषधे post द्वारे तुमच्या घरी पाठवण्यात येतील.
  • औषधे संपण्याच्या काही दिवसआधीची वेळ पुढील मुलाखती साठी घावी. जेणेकरून पुढील औषधे तुमची आधीची औषधे संपण्यापूर्वी तुमच्या घरी पोहोचतील.
  • जर अती तीव्र त्रास होत असेल तर फोन वरून सांगितलेले होमिओपथिक औषध जवळच्या होमिओपथिक pharmacy मधून आणता येऊ शकते किंवा तातपुरते Allopathyचे औषध घेता येऊ शकते.
  • जर उपचारा दरम्यान कधीही शारीरिक तपासणीची गरज आहे हे जाणवले तर आमच्या दवाखान्यात बोलवावे लागू शकते. किंवा पुण्याबाहेरील रुग्ण जवळच्या डॉक्टरांना दाखवून त्यांच्या कडून तपासणी करून त्यांचे मत घेऊ शकतात.
  • ज्या रुग्णांमध्ये सततच्या शारीरिक तपासणी शिवाय उपचार करणे शक्यच नाही किंवा ज्यांना continuous medical observation ची गरज आहे त्यांमध्ये फक्त online consultation करता येणार नाही. अश्या रुग्णांना पूर्व कल्पना देऊन त्यांच्या जवळील डॉक्टरकडे refer करावे लागू शकते.
  • होमिओपॅथिक औषधे उपाशी पोटी घेऊन चालतात. ज्या प्रमाणे सांगितले जाईल त्या प्रमाणे दिवसातून त्या त्या वेळी तुम्ही औषधे घेऊ शकता.
  • औषधाच्या गोळ्या हातात घेऊन खाऊ नयेत. औषधाच्या बाटलीच्या झाकणात काढून अथवा स्वच्छ चमच्यात काढून त्या तोंडात टाकाव्यात. आणि चघळून खाव्या.
  • औषधे घेण्या आधी आणि नंतर २० मिनिटे काही खाऊ नये अथवा पेय पिऊ नये. जेणेकरून तुमचे तोंड आणि जीभ स्वच्छ असेल आणि औषधाच्या शोषणा मध्ये अडथळा निर्माण होणार नाही. पाणी पिण्यास हरकत नाही.
  • तुमच्या आजाराशी निगडीत खाण्याची बंधने सोडता इतर काहीही खाण्यापिण्याची बंधने नसतात. कांदा लसूण कॉफी अश्या तीव्र चावीच्या आणि उग्र वासाच्या पदार्थांचे सेवन केल्यास थोड्या वेळानी तोंड स्वच्छ करून औषधे घेता येऊ शकतात.